आपल्या महाराष्ट्रात मागील वर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले होते. हे नुकसान भरपाई अनुदान जिरायत शेतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायत शेतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर व फळबाग शेतीसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर अशा प्रकारे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. पीक नुकसान भरपाईच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या आलेल्या आहेत.