अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfal) झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या मदतीमध्ये पिकांच्या नुकसानीसोबतच मनुष्यहानी आणि पशुधनाच्या नुकसानीचाही समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही मदत दिली जानार आहे..
अतिवृष्टीदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना चार लाख रुपये इतकी मदत दिली जाणार आहे. पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांसाठीही विशेष तरतूद आहे.
दगावलेल्या दुधाळ जनावरांसाठी ₹३७,५०० रुपये आणि ओढ काम करणाऱ्या जनावरांसाठी ₹३२,००० रुपये मदत मिळेल. लहान जनावरांसाठी ₹२०,००० रुपये आणि शेळी, मेंढी, बकरे व डुक्कर दगावल्यास प्रत्येकी ४००० रुपये देण्याची तरतूद आहे. तसेच, कुक्कुटपालन (Poultry) करणाऱ्या शेतकऱ्यांना १००